एकीकडे या राजीनामा नाट्याला जी अनेक कंगोरे आहेत त्यात मा. आ. अजित पवार बीजेपीच्या वाटेवर ही टॅगलाईन मागच्या काही दिवसापासून माध्यमांच्या केंद्रस्थानी होती. तर राज्य सरकारने सातत्याने राष्ट्रवादीवर कुरगुडी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आपल्याकडे सगळ्यांच्या नजरा वळवण्यासाठी हा अचानक घडवून आणलेला भूकंप होता. त्यामुळे अजित पवारांचा भाजप रस्ता आपोआपच बंद झाला.
दुसरीकडे राष्ट्रीय राजकारणात बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशपातळीवर काही वेगळ्याच हालचाली पाहायला मिळत होत्या. नितीश कुमार यांनी लालू यादव यांचे चिरंजीव आणि मुलायम सिंग यांचे चिरंजीवांना हाताशी धरून राष्ट्रीय राजकारणात आपला जम बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी घेतलेल्या भेटीने सहाजिकच शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणातून आपण बाहेर फेकले जातोय की काय असे वाटत असावे. कारण जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचे सरकार बिहारमध्ये होतं तोपर्यंत विरोधकांचे नेते म्हणून शरद पवार हे अग्रभागी होते. बिहार मधली सत्ता समीकरणे बदलली आणि नितीश कुमार उघडपणे विरोधकांच्या तंबूतील मुख्य आधारस्तंभ बनले. शिवाय त्यांनी ताबडतोब राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीला सक्षम विरोधक म्हणून नेतृत्व देण्याच्या हालचाली सुरू केल्या. यातूनच शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणात नितेश कुमार यांच्या आगमनानंतर आपला फारसा प्रभाव पडत नसल्याचं दिसून येत होतं होतं म्हणून त्यांनी राजीनामा नाट्य घडून राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांना आपणच पक्षाचा अध्यक्ष राहावा अशी मनधरणी करायला भाग पाडले. म्हणूनच शरद पवारांनी आपल्या राजीनामा नाट्यातून आपलं वर्चस्व पुन्हा कायम राखण्याची किमया साधली आहे.