जागतिकीकरण भांडवल आणि खाजगीकरण या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची पारंपारिक जीवनशैली बदलून त्या ठिकाणी भांडवल प्रधान व्यवस्था अस्तित्वात आणल्याचा परिणाम, शून्य भांडवल आधारित पारंपारिक शेतीच कंबर्ड मोडलं, परिणामी शेतकऱ्याला एकीकडे भांडवलशाही शेतीच आकर्षण आणि दुसरीकडे पारंपारिक शेतीतून मुक्त झालेला असुरी आनंद फार काळ टिकणारा नाही हे आता लक्षात येत आहे. कारण भांडवलशाही पद्धतीत गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात भारतीय शेतीतील उत्पादकता उत्पन्न देत नाहीये. परिणामी बुडते भांडवल हा भारतीय शेतीचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवावर उठून त्याला आत्महत्येस प्रवर्त करत आहे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये असणार स्वावलंबनाचे तंत्र आता पूर्णपणे भांडवलशाही पद्धतीमुळे अर्थ तत्त्वावर आधारित असल्याने प्रत्येक लहान कामासाठी त्याला पैसे मोजावे लागतात. या सर्वांचा एकंदरीत परिणाम त्याने आपल्या हक्काच्या परंपरा ज्या कसल्याही भांडवलाच्या आवश्यकते शिवाय चालत होत्या त्या मोडीत काढून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे दिसून येतं.
योग्य आणि नेमक्या शब्दात शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या आहेत सुंदर लेख
ReplyDelete